PM Jeevan Jyoti Bima Yojana : भारत सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना (PM JJBY) सुरू केली आहे. ही एक जीवन विमा योजना असून, यात केवळ 436 रुपये वार्षिक प्रीमियम भरल्यास 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. देशभरातील नागरिक या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत.
देशातील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवते. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना सुरू केली आहे. या योजनेत सामील होणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच, अर्जदाराचे बँक खाते असणे गरजेचे आहे. या योजनेत सहभागी झाल्यानंतर वार्षिक 436 रुपये प्रीमियम बँक खात्यातून ऑटो-डेबिट केला जातो.
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना दरवर्षी 1 जूनपासून सुरू होऊन 31 मेपर्यंत लागू असते. यामध्ये सहभागी होण्यासाठी जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करता येतो. अर्ज करताना आधार कार्ड, ओळखपत्र, बँक पासबुक, पासपोर्ट साईझ फोटो आणि मोबाईल नंबर यांसारखे आवश्यक दस्तऐवज जमा करावे लागतात.
ही योजना गरीब आणि आर्थिक दुर्बल कुटुंबांसाठी मोठ्या मदतीचा हात ठरू शकते. कमी खर्चात मोठे विमा संरक्षण मिळत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
🔴 हेही वाचा 👉 एसबीआयच्या नव्या नियमामुळे ग्राहक त्रस्त, खरेदी करावा लागणार नवीन मोबाईल.